निवडणूक संपली असली तरी, महाराष्ट्ररक्षणाचा आपला संग्राम संपलेला नाही –आदित्य ठाकरे
निवडणूक जरी संपली तरी महाराष्ट्ररक्षणाचा संग्राम संपलेला नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांचे अभिनंदन करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण […]
मराठा, मुस्लिम, दलित एक झाल्यास भाजपाला चिरडून टाकतील –जरांगे
भाजपवाले फार कलाकार आहेत.त्यांनी पहिली महाविकास आघाडी संपवली. आता शिंदेचा आणि अजितदादाचा काटा काढला. मात्र मराठा, मुस्लिम आणि दलित एक झाल्यास ते भाजपला चिरडून टाकतील असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. परळीतील मिरवट येथे आज ते माध्यमांशी बोलत होते. जरांगे यांनी परळीतील मिरवट येथे आज शनिवारी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. […]
मुंबईची राणी! युपीविरुद्ध एकटी भिडली, WPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा खेळ WPL 2026 मध्ये आतापर्यंत सर्वसाधारण राहिला आहे. मुंबईने पाच सामने खेळले असून त्यांना फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. काल (16 जानेवारी 2026) झालेल्या युपी वॉरियर्झविरुद्धच्या सामन्यातही मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या सामन्यात मुंबईची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केरने एकहाती सामना फिरवण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला. ती सामना जिंकवू शकली […]
ऐन संक्रांतीच्या धावपळीत बचत गटाची मिटिंग आहे आणि देवदर्शनही करायचे आहे. असे सांगून गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील भोळ्याभाबड्या महिलांना जेजुरीत घेऊन गेले. मतदानाच्या दिवशी पिंपरी-चिंचवड भागात घेऊन जात त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना मतदान करायला लावले. देवदर्शन न करता गावाकडे आणून सोडले. संतापलेल्या महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि […]
जयपूर महोत्सवाच्या व्यासपीठावर मराठीचा डंका
जगभरातील साहित्य वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या जयपूर साहित्य महोत्सव 2026 ला नुकतीच जयपूर येथे सुरुवात झाली. 15 ते 19 जानेवारी या कालावधीत पार पडत आहे. महोत्सवाचे हे १९ वे वर्ष असून यंदा सुमारे ५०० वक्ते सहभागी होत आहेत. लेखक, विचारवंत, तज्ज्ञ यांची व्याख्याने, संभाषण सत्र विशेष आकर्षण असतात. विविध देशांच्या व प्रदेशांच्या भाषा, संस्कृती आणि विचारसरणीचे […]
Sangli Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे किंगमेकरचे स्वप्न भंगले
भाजप-राष्ट्रवादी संभाव्य सत्ता गठबंधनावर राजकीय चर्चा सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाने आपली ताकद दाखवित तब्बल १६ जागांवर विजय मिळविला आहे. यश समाधानकारक मिळाले असले तरी किंगमेकरच्या भूमिकेचे स्वप्न मात्र भंगताना दिसत आहे. राष्ट्रवादी [...]
Solapur News : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
सांगोला तालुक्यात केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल सोलापूर : मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याकडे पाठ फिरवली. सांगोला तालुक्यातील [...]
Solapur News : सोलापूर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; कार्यालयासमोर जल्लोष
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘धुरंदर’ स्टाईल अॅक्टिंग चर्चेत सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर सायंकाळी भाजपच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘धुरंदर चित्रपटातील भूमिकेप्रमाणे बंदूक चालविण्याची अॅक्टिंग केली तर आ. [...]
Solapur News : पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही हे दाखवून देणारा निकाल : पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूरच्या जनतेने ऐतिहासिक निकाल दिला सोलापूर : महापालिका निवडणुकीत सोलापूरच्या मतदारांनी ना भूतो, ना भविष्यते असे यश दिले. त्यामुळे मी सोलापूरच्या मतदारांसमोर नतमस्तक होतो. पक्षापेक्षा कुणीही मोठा नसल्याची बाब सिध्द करणारा हा निकाल आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री [...]
इराण अजूनही पेटलेलेच, हिंसक निदर्शनांमध्ये ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू
इराणमध्ये डिसेंबर २०२५ च्या अखेरीस सुरू झालेल्या राष्ट्रव्यापी विरोध प्रदर्शनांनी हिंसक रूप धारण केले असून येथे गेल्या १९ दिवसांत ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असा दावा विविध मानवाधिकार संघटना आणि रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. ही संख्या १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमधील सर्वात मोठ्या अंतर्गत संघर्षांपैकी एक ठरली आहे. अमेरिकेतील ह्युमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज […]
सांगोला अंबिकादेवी यात्रेत शेतीमाल प्रदर्शन सांगोला : सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती सांगोला व कोर्ट रिसीव्हर्स यांच्या वतीने सालाबादप्रमाणे (रथसप्तमी) श्री अंबिकादेवीच्या यात्रेनिमित्त शेतीमालाचे प्रदर्शन व विविध स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती कोर्ट रिसिव्हर्स श्री अंबिकादेवी [...]
Sangli News : जत तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; नातेवाईकांचा घातपाताचा संशय
बनाळी येथील मल्हारी कोकरे यांचा संशयास्पद मृत्यू जत : बनाळी येथील मल्हारी भाऊसो कोकरे (वय ३१) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूबाबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मल्हारी [...]
सहाव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे बिल 4 कोटी 62 लाख 55 हजार 737 रूपये शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा
धाराशिव (प्रतिनिधी)- सहाव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे बिल 4 कोटी 62 लाख 55 हजार 737 रूपये शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे. तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादक शेतकर्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा एनव्हीपी शुगर परिवाराने सुरू केली आहे. द्वितीय गळीत हंगाम 2025 - 26 मधिल सहाव्या पंधरवाड्यात 01 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीतीत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल 2700/- प्रमाणे दि.16 जानेवारी 2026 रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैवं दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून […]
तुळजाभवानी महाविद्यालयात विवेकानंद सप्ताह अंतर्गत ज्ञानशिदोरी दिन विविध उपक्रमाने उत्साहात संपन्न
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे विवेकानंद सप्ताहतंर्गत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस *ज्ञानशिदोरी दिन* विविध अभिनव उपक्रमाने महाविद्यालयात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग यांच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून. ज्ञानशिदोरी दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन, वाचन संकल्प, महाविद्यालयाचे प्राचार्य,प्रमुख पाहुणे, गुरुदेव कार्यकर्ते यांच्या हस्ते ज्ञानशिदोरी वाटप (विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तके,ग्रंथ वाटप) करण्यात आले. तसेच विविध उपक्रम मोठ्या उत्साहाने, यशस्वीपणे राबविण्यात आले. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्राचार्य जीवन पवार, प्रमुख पाहुणे ,गुरुदेव कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विवेकानंद सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना आणि एन सी सी यांच्या वतीने व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे , आरोग्य तपासणी शिबिर याचे आयोजन करण्यात आले, यावेळी एकुण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 60 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या आरोग्य तपासणी अंतर्गत तपासणी रक्तगट तपासणी करण्यात आली. तसेच आदरणीय कार्याध्यक्ष साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त महाविद्यालय व महाविद्यालय परिसरात मान्यवर, प्रमुख पाहुणे , महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन पर व्याख्यान प्रा. डॉ. विनोदकुमार वायचळ (हिंदी विभागप्रमुख, व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, धाराशिव) यांचे “स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक” या विषयावर सखोल मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इत्यादी विविध उपक्रमांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांचा 81 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार, विवेकानंद सप्ताहाचे संयोजक आणि विभाग प्रमुख डॉ. मंत्री आडे, डॉ. बापुराव पवार. डॉ. नेताजी काळे, प्रा. बालाजी कऱ्हाडे, प्रा. स्वाती बैनवाड, ग्रंथपाल डॉ. दीपक निकाळजे,प्रा.गोकुळ बाविस्कर, प्रा. निलेश एकदंते , प्रा. सुदर्शन गुरव, प्रा. बाळू कुकडे, प्रा. राणुबाई कोरे, डॉ.तांबोळी मॅडम प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर, प्रा. सतीश वागतकर प्रा. अनिल नवत्रे, प्रा. शिवाजी जगताप, तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खेळ महत्वाचा- इगे
धाराशिव (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रात करियरच्या संध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या क्षेत्राविषयी पालकांची जागरूकता वाढलेली असली तरी फक्त करियर म्हणूनच नाही तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राकडे पाहणे आवश्यक असल्याचे मत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी व्यक्त केले. राज्य क्रीडा दिन निमित्त धाराशिव जिल्हा स्केटिंग संघटनेच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि राष्ट्रीय खेळाडू यांचा गौरव जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी सचिन देवगिरे, धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष ऍड जयंत जगदाळे, सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, संचालक रवींद्र जाधव, किरण शानमे, स्पर्धा विभाग प्रमुख कैलास लांडगे, तांत्रिक समिती प्रमुख यशोदीप कदम आदींसह खेळाडू पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्तीथी होती. राज्य क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तर स्केटिंग स्पर्धेत 63 खेळाडू सहभागी झाले होते त्यांच्या पारितोषिक वितरणासह विविध क्रीडा प्रकारातील 21 राष्ट्रीय खेळाडूंना यावेळी गौरविण्यात आले.
प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन
भूम(प्रतिनिधी)- प्राईड इंग्लिश स्कूल, भूम येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अमेरिका येथील सॅन फ्रँसीस्को येथे स्थायिक पॅनमॅटिक इंटरनॅशनल कंपनी चे संचालक इंजि. मनोज दणाने यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन, विविध क्रीडा प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटनप्रसंगी इंजि. मनोज दणाने यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण होतो, असे प्रतिपादन केले. निरोगी शरीरातच निरोगी मन वसते. त्यामुळे अभ्यासासोबत खेळालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास शाळेचे पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपीका टकले यांनी केले. तर सूत्रसंचालन मेघा सुपेकर यांनी केले. आभार प्रदर्शन मोनिका बोराडे यांनी मानले. क्रीडा महोत्सवात विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पुढील दोन दिवस विद्यार्थ्यांमध्ये क्रीडात्मक उत्साह पाहायला मिळणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे, स्वप्नील सुपेकर आदींनी परिश्रम केले आहे.
स्वार्थासाठी भाजप प्राचीन मंदिरे पाडत आहे; अखिलेश यादव यांचा आरोप
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काशी आणि देशातील प्राचीन मंदिरांवरून भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. अखिलेश यादव म्हणाले की, भाजपला वारसा आणि संवर्धनाची काहीच समज नाही आणि ते इतिहास पुसून स्वतःचा इतिहास घडवू इच्छितात. नफा कमावण्यासाठी प्राचीन मंदिरे पाडली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अखिलेश यादव म्हणाले […]
शासकीय रेखाकला परीक्षेत माडखोल विद्यालयाचा निकाल १०० टक्के
ओटवणे : प्रतिनिधी सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा माडखोल माध्यमिक विद्यालयाचा १०० निकाल टक्के लागला. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेला या प्रशालेतून बसलेले सर्व ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात एलिमेंटरी परीक्षेत प्रशालेचे २ विद्यार्थी ए श्रेणीत, २ विद्यार्थी बी श्रेणीत तर २४ विद्यार्थी सी श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेत या [...]
Sangli News : पळा… पळा… तारा वाघीण आली! मानवी वस्तीलगत बाघीणीची दहशत
वारणावती परिसरात बाघीण तारा by भरत गुंडगे वारणावती : पळा..पळा.. तारा वाघीण आली अंगणी आता आपल्या मुलाबाळासह पाळीव जनावराचे कस होणार… ही अवस्था आहे चांदोली परिसरातील अभयारण्यालगत असणाऱ्या ग्रामस्थांची. कधी तारा, कधी चंदा मानवीवस्ती लगत आल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. गेले चार दिवस शेवताई [...]
Satara News : साताऱ्यात फुटपाथवर ‘टपरी भाडे’ व्यवसायामुळे पालिकेला अडचण
सातारा शहरातील फुटपाथ व्यापाऱ्यांवर कार्यकर्त्यांचा नियंत्रण सातारा : नेत्यांचे फोटो खिशात ठेवून मिरवणारे कार्यकर्तेच रस्त्याच्या कडेच्या जागेचे आकारमानानुसार भाडे ठरवून स्वतःचा खिसा गरम करतात. अगदी १० बाय ८ च्या टपरीला दररोज २०० रुपये बसुल करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे अर्थकारण सुरु आहे. यावर पालिकेचा अतिक्रमण हटाव विभागही हातावर हात [...]
Satara News : ‘स्थानिक’साठी महाबळेश्वरला प्रशासकीय यंत्रणा सज्ज
जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया महाबळेश्वर तालुक्यात सुरळीत सुरू महाबळेश्वर : नुकत्याच जाहीर झालेल्या पंचायत समिती समिती व जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेला शुक्रवार दि. १६ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. तालुका प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी [...]
मिंधेंना फुटीची धास्ती! मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवले
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवशक्तीने महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. या निवडणुकीत मिंधेंचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, मिंधेंना निवडून आलेल्या नगरसेवकांवरच विश्वास नसल्याचे दिसून आले आहे. नवनिर्वाचित नगरसेवक फुटण्याची भीती मिंधे यांना वाटत […]
इंधन बचत करणे ही काळाची गरज- प्राचार्य केशव पवार
कळंब (प्रतिनिधी)- सध्याच्या परिस्थितीत इंधन बचत करणे ही केवळ गरज नसून काळाची अपरिहार्यता आहे. इंधनाची बचत करून राष्ट्राच्या विकासाला हातभार लावला पाहिजे, असे प्रतिपादन कळंब आगार संत श्रेष्ठ गोरोबा काका शाशकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य केशव पवार यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ दि. 16 जानेवारी रोजी कळंब बस आगारात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विनोद अलकुंठे हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय यंत्र अभियंता सुर्यकांत थोरबोले, संतश्रेष्ठ गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य केशव पवार, नितेश पडद्यन, प्रा. मोहन जाधव, कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, स्थानक प्रमुख सुरज पायाळ, निलेश जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी राज्य परिवहन महामंडळातील वाहक, चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना इंधन बचतीचे महत्त्व सांगितले. इंधनाचा योग्य वापर करून प्रत्येक आगार तोट्यातून नफ्यात कसा आणता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर झांबरे यांनी मानले. या प्रसंगी वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप, लखन कांबळे, श्रीमती शिंदे मॅडम, शेख मॅडम, वैभव बंडे, चौवरे, विलास जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांत्रिक कर्मचारी, वाहक व चालकांनी विशेष परिश्रम घेतले. इंधन बचत मोहिमेमुळे आगाराच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन एसटी महामंडळाला आर्थिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
भूम नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी जनशक्तीच्या लक्ष्मी साठे
भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनशक्तीच्या लक्ष्मी साठे तर स्वीकृत नगरसेवकपदी यशवंतराव थोरात यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे सर्वांनी स्वागत करून कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी भूम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष, गटनेतेपद, मूख्य प्रतोद व स्वीकृत नगर सेवकाच्या निवडी संदर्भात प्र. मुख्याधिकारी प्रविण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी उपाध्यक्षपदी लक्ष्मी साठे, गटनेतेपदी रुपेश शेंडगे, मुख्य प्रतोदपदी विठठल बागडे, तर स्वीकृत नगरसेवक पदी यशवंतराव थोरात यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, भाजपचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटिल, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, माजी पंचायत समिती सदस्य सिताराम वनवे, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, अल्प संख्यांक तालुका अध्यक्ष प्रदिप साठे, सहकार आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी, शुभम खामकर, सिद्धार्थ जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष लता गोरे, आदिवाशी पारधी महासंघ तालुका अध्यक्ष दत्ता काळे यांचेसह जनशक्ती आघाडीचे सर्व 15 नगरसेवकांची उपस्थिती होती.
गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- गावसूद येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली,संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांच्या पुढाकारात गावसूद येथील आकाश नानासाहेब तेरकर, जितेंद्र देशमुख, नानासाहेब सगर, बालाजी तेरकर, बप्पा एडके, दादासाहेब साळुंखे, प्रकाश घायाळ, ऋषी घायाळ, अभिषेक तेरकर, सुरज एडके, विशाल एडके, बालाजी लांडगे, राजेश निचळ, मोहन घायाळ, परमेश्वर गायकवाड, आकाश दशरथ, सगर सचिन, अजय लांडगे, विश्वजीत सगर, समर्थ सुरवसे, अभिजीत सुरवसे, राज सगर, करण सगर, विशाल गायकवाड आदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. यावेळी तालुकाप्रमुख सतीश सोमानी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, नगरसेवक पंकज पाटील, युवानेते किरण बोचरे, वडगाव उपसरपंच जयराम मोरे, विक्रम पाटील, जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर, संभाजी सलगर, अक्षय खळदगर, रोहन देशमुख उपस्थित होते.
Satara News : खासदार उदयनराजे यांनी पालकमंत्र्याला दिली “जादू की झप्पी”
राजकीय वर्तुळात उदयनराजे–शंभूराज भेटीवर चर्चेचा उधाण सातारा : सातारा जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणापासून सध्या थोडासा ब्रेक घेतलेल्या खासदार उदयनराजे भोसले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची पुणे–बेंगलोर महामार्गावर अचानक झालेली भेट शुक्रवारी चर्चेचा विषय ठरली. या अनपेक्षित भेटीत उदयनराजेंनी शंभूराज देसाई [...]
परंडा (प्रतिनिधी)- जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातात महानगरपालिका निवडणूकीत मोठे दैदिप्यमान यश मिळवून भाजपा पक्ष अव्वल ठरला आहे. भारतीय जनता पार्टीच्या या अभुतपुर्व यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे मोठा जल्लोष साजरा केला. भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी उपस्थित सर्वांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी हलगी वाजवत फटाके फोडत भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, युवा नेते परंडा नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, विकास कुलकर्णी, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, शिवाजीराव पाटील, शहाजीआप्पा पाटील, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, श्रीराम देवकर, कांतीलाल पाटील, श्रीमंत शेळके, बबनराव चौधरी, अरुण करळे, बाळासाहेब गोडगे, पांडुरंग मुसळे, दिव्यांग आघाडी संयोजक तानाजी घोडके, साहेबराव पाडुळे, विलास खोसरे, जयंत सायकर, भारत भोई, महावीर भोई, रविकुमार गरड, धनंजय काळे, मनोहर पवार, गौरव पाटील, अजिम हन्नुरे, संतोष गायकवाड, आकाश मदने, अमर ठाकूर, कार्तीक दिक्षित, तुषार कोळेकर, समाधान कोळेकर, व्यंकटेश दिक्षित महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात आयुष्मान कार्डसाठी विशेष ई-केवायसी मोहिम ; लाभार्थ्यांना मिळणार आरोग्य सेवांचा लाभ
धाराशिव (प्रतिनिधी)- आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या आयुष्मान कार्डसाठी ई-केवायसी मोहिम राबविण्यात येणार आहे.या योजनेचा सर्वकष आढावा घेण्यासाठी 1 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सध्या जिल्ह्यात 15.23 लाख लाभार्थी असून त्यापैकी 7.31 लाख लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी केले आहे.लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी आशा कर्मचारी,स्वस्त धान्य दुकान चालक व “आपले सरकार सेवा केंद्र” कर्मचारी यांना यशस्वी ई-केवायसी साठी 20 रुपये आणि आयुष्मान कार्ड वितरणासाठी 10 रुपये मानधन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति कुटुंब वर्षाला 5 लाख रुपये मोफत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ मिळणार असून,जिल्ह्यातील 27 खाजगी आणि 13 शासकीय,एकूण 40 रुग्णालयांमध्ये तसेच महाराष्ट्रातील सुमारे 2300 रुग्णालयांमध्ये हा लाभ उपलब्ध आहे. मोफत आयुष्मान कार्ड ग्रामपंचायत स्तरावर, केंद्रे,आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातील.तसेच 70 वर्षांवरील नागरिकांनी “वय वंदना कार्ड” काढून वैयक्तिक व कौटुंबिक विमा 5 लाख रुपयांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही विशेष मोहिम 09 जानेवारीपासून ते 31 जानेवारी 2026 पर्यंत राबविण्यात येणार असून,लाभार्थी गाव,वार्ड,वस्ती,शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण करू शकतात.तसेच आयुष्मान ॲप वापरून लाभार्थी स्वतः देखील ई-केवायसी पूर्ण करू शकतात. जिल्ह्यात आयुष्मान कार्डचे ई-केवायसी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय नियोजन करून 31 जानेवारी 2026 अखेर सर्व लाभार्थ्यांचे 100 टक्के ई-केवायसी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी दिली.
Photo –आता मजबुतीने, एकजुटीने काम करूया –उद्धव ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या यशाचे तुम्ही सर्व मानकरी आहात; आता मजबुतीने, एकजुटीने काम करूया असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे तसेच शिवसेना नेते, उपनेते, सचिव, […]
सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण करणाऱ्यावर होणार कारवाई
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात प्रशासनाने सार्वजनिक मालमत्ताचे विद्रुपीकरण करण्यासंबंधी कडक आदेश जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू असल्याने,जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी हे आदेश दिले आहेत. निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय सार्वजनिक मालमत्ता यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपीकरण होऊ नये,यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स तसेच भिंतीवर जाहीरात प्रदर्शित करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी संपल्यानंतर हे साहित्य तात्काळ काढून टाकणे व मालमत्ता पूर्ववत करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये हा आदेश जारी केला असून, हा आदेश 13 जानेवारीपासून ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अंमलात राहील.या आदेशाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व सुव्यवस्था राखणे हा आहे.
निवडणूक काळात लाऊडस्पीकर वापरावर प्रतिबंध
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम जाहीर केल्याने त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी,या दृष्टीकोनातून निवडणूक काळात लाऊडस्पीकरच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, निवडणुका कोणत्याही अडथळ्याविना व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत ध्वनीक्षेपकांच्या वापरावर जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी प्रतिबंध केला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार,जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत कोणत्याही वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊनच करता येईल.मात्र, ध्वनीक्षेपकाचा वापर करताना वाहन चालू ठेवणे प्रतिबंधित राहील. तसेच, वाहनावर बसवलेले असोत किंवा अन्य प्रकारचे असोत,सर्व प्रकारच्या ध्वनीक्षेपकांचा वापर दररोज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगीयोग्य राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, निवडणूक उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी ध्वनीक्षेपक वापरासंबंधीची परवानगी व तपशील संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नजिकच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील. या आदेशाचा कोणीही भंग केल्यास संबंधित व्यक्ती भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार शिक्षेस पात्र ठरणार आहे.हा बंदी आदेश दिनांक 13 जानेवारीपासून ते दिनांक 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत अंमलात राहील.
निवडणूक काळात नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम जाहीर केल्याने त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, या दृष्टीकोनातून नमुना मतपत्रिका छपाईबाबत निर्बंध घातले आहे. राजकीय पक्ष,निवडणूक लढविणारे उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी अथवा हितचिंतक, तसेच मुद्रणालयांचे मालक, इतर सर्व माध्यमांतून छपाई करणारे मालक व प्रकाशक यांनी नमुना मतपत्रिका छापताना काही बाबींचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामध्ये इतर उमेदवारांचे नाव व त्यांना आयोगाने नेमून दिलेले चिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केलेल्या प्रकारचा कागद वापरणे आणि आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातच नमुना मतपत्रिका छापणे यास निर्बंध करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार,नमुना मतपत्रिकांच्या छपाईवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत,म्हणजेच दिनांक 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत, निर्बंध लागू राहतील. हे आदेश दिनांक 13 जानेवारी ते दिनांक 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत अंमलात राहतील.
Satara News : साताऱ्यात ऑलिंपिक वीर स्व. पै. खाशाबा जाधव यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी
स्व. पै. खाशाबा जाधव यांची १०१ वी जयंती सातारा : ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू, ऑलिंपिक वीर स्वर्गीय पै. खाशाबा जाधव यांची १०१ वी जयंती १५ जानेवारी रोजी पोलीस कवायत मैदान, सातारा [...]
जमिनीवरची शिवसेना कधीच संपलेली नाही, उद्धव ठाकरे यांनी भरला हुंकार
आपला महापौर व्हावा हे स्वप्न तर आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही नक्की घडेल, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच काहींना असे वाटत असेल की शिवसेना त्यांनी कागदावर संपवली आहे. पण जमिनीवरची शिवसेना कधीच संपलेली नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विजयी […]
इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील निवडणूक जाहिरातींचे प्रमाणन समितीकडून सातारा : सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित करण्यात येणा-या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक विषयक सर्व जाहिरातीचे माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कडून पूर्व प्रमाणन करून घेणे अनिवार्य आहे. समाज माध्यमांचा समावेश, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या श्रेणीत करण्यात आल्याने [...]
Kolhapur News : शिरोलीत फॅब्रिकेशन करताना विजेच्या धक्क्याने तरुण ठार
नागाव, माळवाडी येथे विजेच्या धक्क्यामुळे अपघात पुलाची शिरोली : फॅब्रिकेशनचे कामकरताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला. सागर शिवानंद बावकर (वय ३८, सद्या रा. कासेगाव, जि. सांगली, मूळ रा. रामतीर्थ गल्ली, हलशी ता. खानापूर, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. नागाव, ता. हातकणंगले येथील बाळूमामा कॉलनी, [...]
Kolhapur : उचगाव रेल्वे ब्रिजवर भीषण अपघात; कारचालक जागीच ठार
कोल्हापूर मार्केट यार्ड समोर उचगाव अपघात उचगाव : उचगाव भरधाव कारने ऊसतोड मजूर घेऊन जाण्या ट्रकला पाठीमागून जोरदार बहक दिल्याने कारचालक सोहम मदन मार्केट यार्ड समोर जायव वाडी कोल्हापूर) हा जागीच ठार तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले. हा [...]
Kolhapur : दिलेला शब्द पाळावा; मंत्री हसन मुश्रीफ यांना अंबरिषसिंह घाटगे यांचे आवाहन
कापशी–चिखली मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा सेनापती कापशी : अन्नपूर्णाकारखान्याच्या उभारणीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी मदत केली. त्यावेळी संजयबाबांनी त्यांना शब्द दिला होता की येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तो शब्द आम्ही पाळला. त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दोन जिल्हा [...]
बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या; गाडीखाली चिरडले, परिसरात तणावाचे वातावरण
बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता तिथे एका हिंदू तरुणाची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना राजबारी जिल्ह्यातील सदर उपजिल्हामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव आणि संताप निर्माण झाला. मृत व्यक्तीची ओळख ३० वर्षीय रिपन साहा अशी झाली आहे. तो राजबारीतील गोलंडा मोर जवळील करीम फिलिंग स्टेशनवर काम करत होता. […]
सरकारडून फक्त तात्पुरती मलमपट्टी, इंदूरच्या दूषित पाण्यावरून राहुल गांधी यांची टीका
इंदूर (मध्य प्रदेश) येथे भगिरथपुरा परिसरातील दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी या भागातील पाण्याच्या टाकीसमोर उभे राहून परिस्थितीवर भाष्य केले. राहुल गांधी म्हणाले की, “ही पाण्याची टाकीच या भागात अजूनही स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याचे प्रतीक आहे. […]
कोल्हापुरात निवडणूक निकालाची धग कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिवाजी पेठेतील मर्दानी खेळाचा आखाडा परिसरात बोंद्रे – खराडे गटात तुफान राडा झाला. शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विजयी मिरवणुकीच्या निमित्ताने [...]
डीके शिवकुमार यांचा दावोस दौरा रद्द; जाणून घ्या कारण…
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्वित्झर्लंडच्या दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांचा नियोजित असलेला अधिकृत दौरा रद्द केला आहे. 18 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात ते सहभागी होणार होते, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला आहे. त्यामुळे आता कर्नाटकात राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या […]
शिवसेनेच्या माजी आमदार नीला देसाई यांचे निधन
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार नीला देसाई यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवसेना माजी आमदार नीला देसाई ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/p5QeG8iNk4 — Arvind Sawant (@AGSawant) January 17, 2026
1980 साली अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली होती. पण आता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी आडवाणी आणि जोशी मतदान करू शकणार नाही. ज्यांनी पक्षाची स्थापना केली त्यांनाच पक्षाचा अध्यक्षाला मतदान करण्यापासून वंचित ठेवले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात 20 जानेवारी 2026 हा दिवस महत्त्वाचा ठरणार […]
अमेरिकेने अनेक देशांशी व्यापार करार पूर्ण केला आहे. मात्र, हिंदुस्थानसोबतचा व्यापार करार अद्यापही रखडला आहे. दोन्ही बाजूंकडून काही सुधारणा अपेक्षित असल्याने कराराच्या प्रस्तावाला अंतिम स्वरुप आलेले नाही. आता हा करार लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून वाटाघाटी आणि चर्चा सुरू आहे. अमेरिकन सिनेटरनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून हिंदुस्थानला अमेरिकन वाटाणे आणि डाळींवरील कर रद्द […]
‘बर्च’प्रकरणाचा चौकशी अहवाल उघड करा
विरोधकांची विधानसभेत मागणी : सभापतींच्या समोर येत नोंदवला निषेध,जबाबदार मंत्र्याला त्वरित हटवा,प्रकरण सीबीआयकडे द्या पणजी : हडफडे ‘बर्च’ अग्नितांडव प्रकरण सीबीआयकडे देऊन दंडाधिकारी चौकशी अहवाल उघड करा आणि विधानसभेत मांडा, अशी मागणी करीत विरोधी आमदारांनी सभापती गणेश गांवकर यांच्यासमोरील हौदात निषेध नोंदवला तसेच घोषणाबाजी केली. नंतर ते खाली बसले आणि प्रश्नोत्तर तास संपेपर्यंत त्यांनी निषेध [...]
अनेकविधेयकांनामान्यता: हिवाळीविधानसभाअधिवेशनाचासमारोप पणजी : अनुदानित मागण्या 2025-2026 वर्षाच्या खर्चाला मान्यता देणाऱ्या गोवा विनियोग विधेयक 2026 विधानसभा सभागृहात संमत करून हिवाळी विधानसभा अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीविनियोग विधेयक 2026 सादर करून ते सभागृहात संमत केले. गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने 12 जानेवारीला सुरुवात झाली होती. हे अधिवेशन पाच दिवस चालले. काही [...]
दोन रशियन युवतींचा मित्राकडूनच खून
हरमल, मोरजीयेथीलघटनांमुळेपेडणेतालुकाहादरला, संशयितालाअटक, गुन्हानोंद पेडणे : हरमल व मोरजी येथे रशियन पर्यटकाकडून दोन रशियन मैत्रिणींचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली. यामुळे पेडणे तालुका हादरला आहे. मांद्रे पोलिसांनी संशयिताच्या वेगवेगळ्या पद्धतीने जबानी घेतल्या त्यामध्ये एक मैत्रिण हरमल येथे तर दुसरी मैत्रिण मोरजी येथे वास्तव्यास होती. त्यांचा खून केल्याचे उघडकीस आल्याची माहिती दिली. मांद्रे पोलिसांना त्याबाबतची [...]
फसवणूक झालेल्यांची रक्कम परत करणार
मुख्यमंत्र्यांचेविधानसभेतआश्वासन:पूजानाईकचीसर्वमालमत्ताजप्त पणजी : नोकरी घोटाळ्यातील काही तक्रारी कोर्टात असून तेथे निकाल झाल्यावर फसवणूक झालेल्यांना त्यांची रक्कम परत करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. पूजा नाईककडे असलेली सर्व रक्कम, मालमत्ता जप्त करण्यात आली असून तिला देखील गजाआड केले आहे. तिने गोळा केलेली रक्कम स्वत:साठीच खर्च केली असून ती रु. 17 कोटी [...]
सावंतवाडी बाजारपेठेतील रस्ता डांबरीकरणास अखेर सुरुवात
सावंतवाडी : प्रतिनिधी मुख्य बाजारपेठेत पाईपलाईनसाठी खोदलेला रस्ता डांबरीकरण करण्यास आज सकाळी प्रारंभ झाला. नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर नगरपरिषद बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. सकाळपासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नळ पाण्याची लाईन बदलण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, काम पूर्णत्वास येऊन १० दिवस झाले तरी न.प. च्या [...]
फोन पे वरून पोलिसाने स्वीकारले पंधरा हजार रुपये!
डीसीआरई विभागातील अधिकारी-पोलिसावर गंभीर आरोप, वरिष्ठांकडे तक्रार, प्रकरणाची चौकशी अन्य अधिकाऱ्यांकडून करण्याची मागणी बेळगाव : डी. सी. आर. ई. विभागातील एका पोलिसाने न्याय मागण्यासाठी आलेल्या एका तरुणाकडून फोन पेच्या माध्यमातून पंधरा हजार रुपये लाच स्वीकारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाने डी. सी. आर. ई.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार केली असून पुराव्यादाखल ऑडिओ व [...]
मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापराचे दोन बळी
संगमेश्वरनगर, नेहरूनगरयेथीलदोनघटनांनीचिंतेतभर बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे विद्यार्थिनी व एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा बळी गेला आहे. या दोन्ही घटना नागरी समाजाच्या चिंता वाढविणाऱ्या ठरल्या आहेत. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मोबाईलचा अतिवापर करू नको असा सल्ला कुटुबीयांनी दिल्यामुळे एका 17वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संगमेश्वरनगर [...]
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्रच असणार यात शंका नाही, संजय राऊत यांचे विधान
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्रच असणार यात शंका नाही, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच ठाण्यात अधिक लक्ष दिले असते तर निकाल वेगळा असू शकला असता असेही संजय राऊत म्हणाले. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मुंबईची सत्ता आमच्याकडे नाही याचा अर्थ लढाई संपली असा […]
आमच्या पक्षातील 60 नगरसेवक फोडले त्यापैकी 90 टक्के उमेदवारांचा पराभव, संजय राऊत यांचा दावा
आमच्या हातात सत्ता आणि एवढा पैसा असता तर भाजपला देशही टिकवता आला नसता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच आमच्या पक्षातील 60 नगरसेवक फोडले त्यापैकी 90 टक्के उमेदवारांचा पराभव झाला असा दावाही संजय राऊत यांनी केला. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आमच्या हातात सत्ता […]
10 कोटी दे अन्यथा…सुप्रसिद्ध गायक बी प्राक याला बिश्नोई गँगची धमकी, संगीत क्षेत्रात खळबळ
सुप्रसिद्ध पंजाबी गायक बी प्राक याला लॉरेन्स बिश्नोई गँगने खंडणीसाठी धमकी दिली आहे. बिश्नोई गँगने बी प्राक याच्याकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली असून पैसे न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बॉलीवूड आणि पंजाबी संगीत क्षेत्रातील कलाकारांना खंडणीसाठी लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. याआधी खंडणीसाठी खूनही झाले […]
एकनाथ शिंदे जर ‘जयचंद’ ठरले नसते, तर भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता असा घणाघात संजय राऊत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केला. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात मराठी माणसाशी बेईमानी आणि गद्दारी झाली असेही संजय राऊत म्हणाले. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, […]
नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांनी अन्नोत्सवाला आणली रंगत
बेळगाव : रोटरी क्लब बेळगावच्यावतीने आयोजित अन्नोत्सवाला शुक्रवारी मोठा प्रतिसाद मिळाला. नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येत असल्यामुळे अन्नोत्सवामध्ये रंगत वाढली. चाट, स्टार्टर्स, चटपटीत पदार्थ, शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांची मेजवानी आदीमुळे खाद्यप्रेमींचा प्रतिसाद वाढू लागला आहे. यामुळे स्टॉल धारकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. रोटरी अन्नोत्सव आता मोजकेच दिवस असल्याने गर्दीने उच्चांक गाठला आहे. सुमधुर गाण्यांचा [...]
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा शुक्रवारी सकाळी साजरा करण्यात आला. धर्मवीर संभाजी चौक येथील शंभू स्मारकामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार अनिल बेनके उपस्थित होते. या निमित्ताने शंभू स्मारकाला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. प्रारंभी अनिल बेनके यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला. नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती व सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्पहार [...]
Jalna news –धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना व अंबड शहरात संचारबंदी लागू
धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना व अंबड शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163(1) व 163(2) अंतर्गत आदेश जारी केला असून 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. संचारबंदी काळात शाळा, महाविद्यालये, दुकाने व आस्थापना बंद राहणार आहे. शस्त्र, ज्वलनशील पदार्थ […]
बेळगावात उद्या विराट हिंदू मेळावा
स्पर्धा, सत्कार, शोभायात्रेचेहीआयोजन: प्रत्येकठिकाणीवेगवेगळेवक्ते बेळगाव : हिंदू संमेलन समितीतर्फे रविवार दि. 18 रोजी सायंकाळी 5.30 वा. भव्य हिंदू मेळाव्याचे आयोजन शहरात ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. अनगोळ भागाचे संमेलन संतमीरा हायस्कूल येथे होणार आहे. टिळकवाडी भागाचे संमेलन लेले मैदान येथे, जुने बेळगाव येथे कलमेश्वर मंदिर मैदान, टिळकचौक भागाचे बीके मॉडेल मैदान व कपिलेश्वर भागातील संभाजी उद्यान [...]
शंभर खाटांच्या दवाखान्याचे काम निकृष्ट दर्जाचे
खानापुरातील नागरिकांकडून सरकारी दवाखान्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी : कामाचा दर्जा न सुधारल्यास लोकायुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा खानापूर : खानापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी सध्या कार्यरत असलेल्या सरकारी दवाखान्यात रुग्णांची सोय योग्यप्रकारे होत नव्हती. याची दखल घेऊन माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून शंभर खाटांचे हॉस्पिटल खानापूरसाठी मंजूर करून घेतले होते. याचा [...]
बायपासची वर्क ऑर्डर न देण्यामागचे गौडबंगाल काय?
शेतकऱ्यांतूनप्रश्नउपस्थित: तेरावर्षांपासूनकामालाविरोधकायम बेळगाव : हालगा-मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरुच आहे. गेल्या तेरा वर्षापासून शेतकरी रस्त्याची वर्क ऑर्डर द्यावी, अशी मागणी करत आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हाधिकाऱ्यांकडून केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे वर्कऑर्डर न देण्यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाकडून बेकायदेशीररित्या हालगा-मच्छे बायपासचे काम केले जात [...]
जिल्हाधिकारी कार्यालयात उड्डाणपूल कामासाठी आढावा बैठक
बेळगाव : बेळगावशहराचावाहतुकीचाप्रश्ननिकालीकाढण्यासाठीसंकमहॉटेल ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत उड्डाणपूल निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी उड्डाणपूल प्रकल्पासाठी विविध विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सादर करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिकबांधकामविभाग,हेस्कॉम, पाणीपुरवठा विभाग, महापालिका, वाहतूक पोलीस आदी विभागांची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उड्डाणपुलासाठी एनओसी सादर [...]
चंदगड आगाराने सुरू केली बेळगाव-हाजगोळी बससेवा
वार्ताहर/तुडये बेळगाव-तुडये बससेवेसाठी तुडयेत 8 जानेवारीपासून ग्रामस्थांनी सरपंच विलास सुतार व उपसरपंच अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवसाचे साखळी उपोषण केले. बेळगाव वायव्य परिवहन मंडळाची बससेवा सुरू झाली. उपोषणस्थळी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण व आगारप्रमुख सतीश पाटील यांनी भेट देत दोन फेऱ्या देण्याचे सांगितले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी बेळगाव येथून 6.30 वाजता सुटणारी बस सुरू [...]
पांडुरंग सीसी संघाकडे महांतेश कवटगीमठ चषक
के.आर. शेट्टीमंगाईउपविजेता: कुणालसामनावीर, मालिकावीरअसादुहेरीमुकुटाचातसेचदुचाकीचाहीमानकरी बेळगाव : महांतेश कवटगीमठ स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित दुसऱ्या महांतेश कवटगीमठ चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात पांडुरंग सीसी नागरमुन्नोळी संघाने के. आर. शेट्टी मंगाई स्पोर्ट्स संघाचा 22 धावांनी पराभव करून दुसरा महांतेश कवटगीमठ चषक पटकाविला. अष्टपैलू कामगिरी केलेल्या कुणालाला मालिकावीर व सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. सरदार्स [...]
मुंबईसह 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. मुंबईत शिवशक्तीला 73 जागांवर यश मिळाले आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे असे राज ठाकरे म्हणाले. तसेच […]
पुण्यामध्ये अजित पवारांना धक्का
पुणे महापालिकेत सत्तेसाठी जोर लावलेल्या दोन्ही राष्ट्रवादींना जोरदार धक्का बसला आहे. भाजपने 120 जागा मिळवून जोरदार मुसंडी मारल्याने पुण्यात पुन्हा कमळ फुलले आहे. भाजपची एकहाती सत्ता आली असून घड्याळय़ाचा अलार्म वाजलाच नाही. पालिकेतील 165 पैकी अवघ्या 26 जागांवरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस 15, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 3 तर […]
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिलेली झुंज यशस्वी ठरली. काँग्रेस पक्षाला 34 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला एक अशा एकूण 35 जागांवर विजय मिळविला. दरम्यान, 81 जागा असलेल्या महापालिकेत चार सदस्य प्रभाग रचनेमुळे महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले. यामध्ये भाजप 26, शिंदे गट 15, […]
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस आघाडीची सत्ता, भाजपचा पराभव; जनविरोधी कारभाराला जनतेने नाकारले
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने 66 पैकी 40 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवत महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवला. भाजपला धक्का देत काँग्रेसच्या आघाडीने चंद्रपूर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. फटाके फोडत व गुलाल उधळून हा विजय साजरा करण्यात आला. चंद्रपूर महापालिकेतील भाजपच्या अपयशी आणि जनविरोधी कारभाराला जनतेने नाकारले, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. […]
स्व. विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याची उद्दाम भाषा करणाऱया भाजपला लातूरकरांनी जबरदस्त हबाडा दिला. लातूर महापालिकेत काँग्रेसने आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 43 जागांवर दणदणीत विजय मिळवला. एकहाती सत्ता आणणाऱया काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण! काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीने चार जागा मिळवल्या. अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. लातूर […]
छत्रपती संभाजीनगरमध्ये, पैसा जिंकला, मतदार हरला! भाजप बहुमतापासून ‘वंचित’
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोगाच्या कृपेने पैसा जिंकला आणि मतदार हरला. एमआयएमने एकूण 33 जागांवर विजय मिळवला. भाजपने 57 जागा मिळवल्या; परंतु स्पष्ट बहुमतापासून भाजप ‘वंचित’ राहिली. अफाट पैसा उधळूनही मिंध्यांना 13 जागांवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेचे सहा उमेदवार निवडून आले. वंचित बहुजन आघाडीला पाच जागांवर यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शहरात 80 ठिकाणी […]
जोगेश्वरीत मशाल धगधगली! खासदार वायकर यांना धोबीपछाड
जोगेश्वरी विधानसभेत शिवसेनेची मशाल धगधगली. शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना त्यांच्या होमग्राऊंडवर चांगलाच धोबीपछाड मिळाला. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात वायकर हे स्वतःच्या मुलीलाही निवडून आणू शकले नाहीत. शिवसेनेचा गड असणाऱया जोगेश्वरीत विधानसभेत आमदार अनंत (बाळा) नर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने आठ पैकी 4 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आपले वर्चस्व राखले. मनसेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. […]
भाजीत, आमटीत मसाला जास्त झाला…हे करून पहा
भाजीत, आमटीत मसाला जास्त झाला तर घरगुती टिप्सचा वापर करता येईल. एक किंवा दोन उकडून मॅश केलेले बटाटे घाला आणि शिजवून घ्या. यामुळे मसाल्यांची चव कमी होईल. बटाटय़ाऐवजी आपण ब्रेड स्लाईस घालू शकतो. जे पदार्थांची चव शोषून घेतात. ब्रेड घातल्यानंतर काही वेळाने लगेच बाहेर काढा. भाजीमध्ये मसाले जास्त झाल्यास त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तांदळाचा उपयोग […]
श्रवरी परब यांचा दणदणीत विजय प्रभाग क्रमांक 88मधून जोरदार विजय मिळवत शिवसेनेच्या श्रवरी सदा परब यांनी भाजपच्या डॉ. प्रज्ञा प्रसाद सामंत यांचा पराभव केला. या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते तर चार अपक्ष उमेदवार होते. श्रवरी परब यांनी 10 हजार 675 मते मिळवत विजय मिळवला. डॉ. सामंत यांना 7 […]
असं झालं तर…संशयास्पद व्हिडीओ कॉल आला तर…
तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’चा कॉल आला तर घाबरू नका. ही एक मोठी फसवणूक आहे. कोणतीही सरकारी यंत्रणा पह्नवर अटक करत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही. त्यामुळे कॉल लगेच कट करा. कोणालाही ओटीपी, पिन नंबर किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका, कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. त्वरित सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार […]
म्हाडा भवनातील कार्यालयांवर दहा टक्के भाडेवाढीची संक्रांत
नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात असलेल्या विविध कार्यालयांवर भाडेवाढीची संक्रांत येणार आहे. कार्यालयांना देण्यात येणाऱ्या जागेच्या भाडय़ात सुमारे दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या पाच मजली इमारतीमधून म्हाडाचा प्रशासकीय कारभार चालतो. या इमारतीमधील 27 कार्यालये प्राधिकरणाकडून भाडेतत्त्वावर देण्यात आली […]
गोरेगाव पूर्वेकडील प्रभागांमध्येही शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांनीच वर्चस्व राखले. शिवसेना पक्षावरील मतदारांची निष्ठा तसेच शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांची विकासकामांना प्राधान्य देण्याची कार्यपद्धती या जोरावर गोरेगाव पूर्व परिसरात शिवसेनेनेच वर्चस्व राखले. सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू यांनी भाजप महायुतीचे उमेदवार विप्लव अवसरे यांची धूळधाण उडवली. प्रभाग क्रमांक 54 मध्ये अंकित प्रभू यांनी 11,197 मते […]
मुरबाडच्या माळशेजवाडी येथून जुन्नरकडे मजुरीसाठी जाणाऱ्या महिलांच्या टेम्पोला समोरून येणाऱ्या दुधाच्या भरधाव टँकरने धडक दिली. या भीषण अपघातात दोन मजूर महिला जागीच ठार झाल्या. तर 38 जणी गंभीर जखमी झाल्या. या अपघातामुळे माळशेजवाडीवर शोककळा पसरली आहे. रोजगार हमी योजना केवळ नावालाच उरल्याने मुरबाड तालुक्यातील असंख्य आदिवासी पुरुष आणि महिलांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजच पुणे जिह्यातील […]
पूजा महाडेश्वरांचा दणदणीत विजय, भाजपला जोरदार झटका
माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पश्चात पत्नी पूजा महाडेश्वर यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची घोडदौड कायम ठेवत भाजपला चांगलेच लोळवले. प्रभाग क्रमांक 87मधून पूजा महाडेश्वर यांचा 11 हजार 588 मतांनी विजय झाला. भाजपचे उमेदवार महेश पारकर यांना पराभूत करत पूजा महाडेश्वर यांनी दणदणीत विजय मिळवला. 2017च्या निवडणुकीत विश्वनाथ महाडेश्वर यांनी पारकर यांचा पराभव केला होता. 2023मध्ये […]
वरळीत मशाल उजळली, आदित्य ठाकरेंना मतदारांची साथ
वरळीमध्ये शिवसेनेची मशाल अधिक तेजाने उजळली आहे. शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर, निशिकांत शिंदे, विजय भणगे, पद्मजा चेंबूरकर, अबोली खाडये, किशोरी पेडणेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. धनशक्तीच्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले शिंदे गटाचे समाधान सरवणकर यांना निशिकांत शिंदे यांना जोरदार धक्का दिला आहे. शिवसेना आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत सात वॉर्डांपैकी सहा […]
…तर वैभवचा झंझावात मंदावेल, डब्ल्यू. व्ही. रमणला भीती
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये झपाटय़ाने जगप्रसिद्ध झालेल्या अवघ्या चौदा वर्षीय धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेच्या पेंद्रस्थानी आला आहे. या टप्प्यावर वैभवला युवा क्रिकेटमध्येच (19 वर्षांखालील) खेळवत राहिले तर त्याचा झंझावाती खेळ आपोआप मंदावेल, अशी भीती व्यक्त केलीय माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू डब्ल्यू. व्ही. रमण यांनी. रमण यांनी समाजमाध्यमांवर लिहिले की, ‘वैभव सूर्यवंशी आता युवा क्रिकेटच्या खूप […]
महिला क्रिकेटमधील नियम फलंदाजांच्या बाजूने –सोफी डिव्हाइन
महिला क्रिकेट दिवसेंदिवस बदलत असून चाहत्यांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहे. महिला क्रिकेटची प्रसिद्धी वाढवण्यात महिला प्रीमिअर लीगचा (डब्ल्यूपीएल) मोठा हात आहे. त्यात हिंदुस्थानात सध्या सुरू असलेल्या डब्ल्यूपीएलमध्ये जगभरातील खेळाडू आपली कला दाखवत आहेत. अशातच न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार तथा अनुभवी अष्टपैलू खेळाडू सोफी डिव्हाइन हिने महिला क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाचे नियम आणि सीमारेषेच्या अंतरावरून प्रश्न […]
रोहितला वगळण्यामागे गंभीरचाही हात; माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचा आरोप
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा पेंद्रस्थानी आला असून मोठा वाद निर्माण झाला आहे. आयसीसी स्पर्धांत विजेतेपद मिळवून देणाऱया कर्णधार रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या नेतृत्वातून बाजूला करण्याचा निर्णय अनेक क्रिकेट जाणकारांना धक्का देणारा ठरला आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करत हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी या निर्णयाची वेळ आणि कारणे यावर […]
निर्णायक लढतीआधी धोक्याची घंटा! गोलंदाजी फसली, होळकरवर हिंदुस्थानची कसोटी
मालिका कुणाची? हा फैसला लावण्यासाठी यजमान हिंदुस्थान आणि न्यूझीलंड होळकर मैदानावर उतरणार आहेत. पहिल्या दोन सामन्यांत फिरकी गोलंदाजी सपशेल अपयशी ठरली असून किवी फलंदाजांनी हिंदुस्थानच्या रणनीतीला अक्षरशः चिरडून टाकलेय. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यापूर्वी हिंदुस्थानी संघासमोर त्यांचे खडतर आव्हान उभे राहिले आहे. धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे होळकर स्टेडियमवर खेळल्या जाणाऱया निर्णायक सामन्यापूर्वी हिंदुस्थानी […]
मुंबईवर भगवा, भाजप-शिंदेसेनेचा डंका
प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रात मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान झाले. या सर्व निवडणुकांची मतगणना शुक्रवारी करण्यात आली. तथापि, केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर साऱ्या देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर खिळले होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतगणनेला प्रारंभ झाल्यानंतर महायुती प्रारंभापासूनच आघाडीवर होती. तथापि, महायुती आणि विरोधी पक्ष यांच्यातील अंतर अधिक नव्हते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत विजयाचे पारडे [...]
सामनावीर राधा यादवचे अर्धशतक, श्रेयांका पाटीलचे 5, बेलचे 3 बळी वृत्तसंस्था / नवी मुंबई राधा यादवचे अर्धशतक तसेच श्रेयांका पाटीलच्या पाच बळींच्या जोरावर शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेतील नवव्या सामन्यात बलाढ्या आरसीबीने (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर) गुजरात जायंट्सचा 32 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील आरसीबीने सलग तिसरा विजय नोंदवित गुणतक्त्यात आघाडीचे स्थान [...]
सौराष्ट्रचा अंतिम फेरीत प्रवेश, पंजाबवर 9 गड्यांनी विजय,
सामनावीर विश्वराज जडेजाचे नाबाद दीडशतक, साकारियाचे 4 बळी, वृत्तसंस्था/ बेंगळूर सामनावीर विश्वराज जडेजाचे नाबाद दीडशतक, हार्विक देसाई व प्रेरक मंकड यांची अर्धशतके आणि चेतन साकारियाचा भेदक मारा यांच्या बळावर सौराष्ट्रने पंजाबचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करून विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. रविवारी विदर्भ व सौराष्ट्र यांच्यात जेतेपदाची लढत होईल. प्रथम फलंदाजी [...]
सोशल मीडियावर नवा ट्रेंड सोशल मीडियाच्या जगतात एक ट्रेंड संपताच दुसरा सुरु होतो. पूर्वी लाबूबूने लोकांचे लक्ष वेधले आणि आता त्याच्याप्रमाणे मिरुमी चर्चेत आले आहे. खासकरून युवा आणि संग्राहकांदरम्यान मिरुमी वेगाने लोकप्रिय होतेय. काही काळापूर्वीपर्यंत लाबूबू सर्वठिकाणी चर्चेत होते आणि आता त्याची जागा मिरुमीने घेतली आहे. स्वत:चा क्यूट परंतु वेगळा लुक आणि युनिक डिझाइनमुळे मिरुमी [...]
मुंबई- यूपी वॉरियर्स यांच्यात पुन्हा लढत
वृत्तसंस्था / नवी मुंबई 2026 च्या महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेत शनिवारी येथे विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामन्याला दुपारी 3 वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेत गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील हा दुसरा सामना आहे. यूपी वॉरियर्स संघाला या स्पर्धेत पहिल्या तीन सामन्यांत सलग पराभव पत्करावा लागला [...]

24 C